जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती । देह कष्टविती परोपकारे ॥ हा संतांचा अद्वितीय महिमा सांगणार्या संतश्रेष्ठ तुकोबारायांचेच ध्यान चिंतन तपोभूमी डोंगर हे शासनाच्या चुकीच्या औद्योगिक धोरणामुळे धोक्यात आल्यानंतर ही तपोभूमी अबाधित ठेवण्यासाठी शासनाकडे अनेक पत्र प्रस्ताव अर्जाद्वारे पाठपुरावा चालू आहे. तसेच वारकरी सांप्रदायात अनेक आवाहन पत्र प्रसिद्ध करून भंडारा भामचंद्र डोंगर तपोभूमी संरक्षणासाठी जनजागृतीचे कार्य चालू आहे.संत वांड्मयाचे अभ्यासक किर्तनकार, प्रवचनकार, भाविकजन व संत परंपरेला माननाऱ्यांचे संघटन कार्य सुरु करून संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या तपोभूमी डोंगराप्रती शासनाची संवेदनशीलता जागवण्यासाठी अनेक आंदोलने आणि उपोषणे सातत्याने केली व चालू आहेत.
घटनाक्रम:
- घटनाक्रम १. सन २००५ : श्री क्षेत्र भंडारा डोंगरातील संत तुकोबांचे शिवकालीन स्थापित चरणपादुका मंदिर, प्राचीन शिवमंदिर, ब्रिटीशकालीन साधक व वारकऱ्यां साठीची धर्मशाळा चिंतन सभामंडप इत्यादि शासकीय दप्तरी नोंद असलेल्या वास्तु तेथील समितीने अनाधिकृतपणे भुईसपाट केल्यामुळे वारकऱ्यांच्या श्रद्धेला धक्का बसल्यानंतर भामचंद्र डोंगरातील "संत वांड्मयसेवा संस्था" व ट्रस्टी च्या घटना कलमान्वये शासनाकडे तक्रारी दाखल.
- घटनाक्रम 2. श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगरातील सन १९९९ मधील स्थापित "संत वांड्मय सेवा संस्था" व सन २००७ मधील "संत तुकाराम महाराज साक्षात्त्कार भूमी सेवा न्यास" या संस्था व न्यास संचलित संतभूमी संरक्षक संघर्ष समिती स्थापन झाली. यांच्याद्वारा १८ ओक्टोबर २००७ मध्ये भामचंद्र डोंगरातील विध्वंसक खाणी बंद पाडल्या.
- घटनाक्रम 3. १४ डिसेंबर २००७ : संतभूमीतील औद्योगिकीकरण हटवून भामचंद्र व भंडारा डोंगर अबाधित ठेवण्यासाठी श्रीमदभगवतगीता जयंती मध्ये मधुसूदन महाराजांनी पहिले सत्याग्रही , प्राणांतिक उपोषण केले आणि खऱ्या अर्थाने संतभूमी रक्षणासाठी संघर्ष सुरु झाला.
- घटनाक्रम 4. संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांनी संतभूंमी रक्षणासाठी वारकरी सांप्रदायाला आवाहन करून आपल्या सहकाऱ्यांसह प्रबोधनासाठी झंझावाती दौरा सुरु केला. दौऱ्याचे फळ म्हणजे वारकऱ्यांचा या आंदोलनाला सवृत्तक्रिय पाठिंबा मिळून "विश्व वारकरी सेने"द्वारा श्री भंडारा-भामचंद्र डोंगर सपाटीकरणाविरुद्ध पंढरीमध्ये विठ्ठलाला साकडे घालून वारकऱ्यांचा पहिला प्रचंड उठाव झाला.
- घटनाक्रम 5. डिसेंबर २००७ : पुण्यातील "लोकायत" संघटनेच्या अलका जोशी यांनी भंडारा-भामचंद्र डोंगरांच्या पायथ्याला शासनाने आणलेली रासायनिक कंपनी ही "युनियन कार्बाईड" ची आहे हे वृत्त वर्तमान पत्रातून प्रकाशित केले.
- घटनाक्रम 6. ५ जानेवारी २००८ : जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून भामचंद्र डोंगराची संयुक्त पाहणी करून खाणीसंदर्भात अहवाल सादर करणे कामी आलेल्या खेडच्या प्रांताधिकाऱ्याना मधुसूदन महाराजांनी "उद्या ही भामचंद्र डोंगरासमोरची केमिकल कंपनी बंद असेल !" असा खणखणीत इशारा दिला.
- घटनाक्रम 7. माननीय प्रकाश आंबेडकर यांचे या कामी आरंभापासूनच मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले यामुळे त्यांचे कार्यकर्ते व संस्थेचे सचिव श्री. बाळासाहेब मोरे आणि शिंदे गावातील मेजर दत्ता टेमगीरे यांनी जोग सेंट्रल मधील एम.आय.डी.सी. ऑफिस मधून "डाऊ" केमिकल कंपनी संबंधित माहिती माहितीच्या अधिकारात प्रथम प्राप्त केली.
- घटनाक्रम 8. १६ जानेवारी २००८ : मधुसूदन महाराजांच्या अध्यक्षतेखाली "भामचंद्र डोंगर बचाव वारकरी शेतकरी संघर्ष समिती" ने शिंदे गावातील "डाऊ" कंपनीचे काम बंद पाडले व पुढे २ वर्षे हा संघर्ष अविरत चालू राहीला. यासाठी महाराजांना सहकाऱ्यांसह येरवडा कारागृहामध्ये कारावास भोगावा लागला.
- घटनाक्रम 9. मार्च २००९ मध्ये "डाऊ" आंदोलनाचे श्रेय केवळ आपल्यालाच मिळावे म्हणून आंदोलनातील खोटे नेतृत्व करनाऱ्यांनी काही समाज कंटकांद्वारे भामचंद्र डोंगरातील संतभूमी संरक्षणाच्या लढ्यासाठी अपार कष्टाने जमवलेली ऐतिहासिक कागदपत्रे व पुरावे त्याच प्रमाणे महाराजांनी या लढ्याच्या प्रेरणेसाठीच लिहिलेला "अक्षरसाकी" ग्रंथ पेटवून नष्ट केला.
- घटनाक्रम 10. जनशक्ती ! जनशक्ती ! म्हणजेच ईश्वरीय शक्ती हे नास्तिकांना कसे कळणार ? जन नोहे हा अवघा जनार्दन ! या संत वचनाचा मधुसूदन महाराजांना साक्षात्त्कार आहे म्हणूनच जनता जनार्दनाच्या व वारकरी भक्तांच्या रुपाने सन २०१० मध्ये अखेर "डाऊ" चा खात्मा केला.
- घटनाक्रम 11. अजुनही संतभूमीतील आंदोलन संपलेले नाही, संतभूमीचा विजय झालेला नाही.श्री क्षेत्र भामचंद्र - भंडारा डोंगर रक्षणासाठी मधुसूदन महाराजांचा लढा अजुन सुरुच आहे.
- घटनाक्रम 12. गांभिर्याची गोष्ट म्हणजे "आयत्या पीठावर रांगोळी" काढणारे, प्रसिद्धीच्या झोतात आलेले स्वत:ला आंदोलनाचे तथाकथित नेते अशा वेळी मुग गिळून गप्प बसले आहेत. वरील घटनेचा त्यांनी साधा निषेधही व्यक्त केला नाही. यातून समाजाने काय बोध घ्यायचा ?.
- घटनाक्रम 13. शिंदे गावातील "समाजभूषण" कै.शांताराम बापू टेमगीरे यांनी डाऊ केमिकल कंपनीची रसद (खडी, वाळू, पाणी इ.) तोडली नसती आणि आंदोलन यशस्वीतेसाठी ता. खेड, हवेली, मावळ, तळेगावातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून आषाढी कार्तिकी वारीमध्ये भंडारा-भामचंद्र डोंगर बचावासाठी व डाऊ विरोधी हजारो पुस्तिका प्रकाशीत केल्या नसत्या तर हे आंदोलन जड गेले असते याची माहीती आज किती जनांना आहे ?
- घटनाक्रम 14. "संत भूमीचा घात इच्छीती प्रशासकीय नादान । गद्दारांना मुळी न कळले संतभूमी महिमान ॥" अशा गद्दार नेत्यांचा पाडाव करण्यासाठी मधुसूदन महाराजांनी महाभारतीय युद्धानंतर पाच हजार वर्षानी वारकरी सांप्रदायाला श्रीमदभगवतगीतेचे क्रांतीकारी तत्वज्ञान जगण्याचा संदेश दिला व खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात वारकऱ्यांचे अनुशासन लागू करून भ्रष्ट राजसत्तेच्या विरोधात श्री भामचंद्र - भंडारा डोंगर मुक्ती संघर्ष व डाऊ विरोधी आंदोलन युद्धपातळीवर सुरु केले.
- घटनाक्रम 15. श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची तपोभूमी भंडारा-भामचंद्र रक्षणासाठी या आंदोलनामध्ये ज्यांनी तन-मन-धन आणि प्राणपनाने पाठबळ दिले, सहकार्य केले आणि पुढेही आमच्याबरोबर संघर्षात सातत्याने उभे राहून हे ऐतिहासिक कार्य पार पाडण्याचे व्रत ज्यांनी घेतले आहे त्या सर्वांचे "संतभूमी संरक्षक सघर्ष समिती" सदैव ऋणी राहील.